top of page
Search

पूर्णानंद भांडार

  • NSBT
  • Aug 21
  • 3 min read

Updated: Aug 24


ree

जिथे नाश्ता, विद्यार्थी आणि सेवा यांचा सुंदर संगम होतो


१९७१ मध्ये स्व. हरी खरवे यांनी स्थापन केलेलं पूर्णानंद भंडार हे छत्रपती संभाजीनगरातील औरंगपूरा, एस.बी. कॉलनी (पूर्व) येथे आजही ग्राहकांच्या मनात आपलं खास स्थान टिकवून आहे. सध्या तिसऱ्या पिढीकडून चालवलं जाणारं हे भंडार, कुटुंबातील तीन सदस्य आणि एकूण सहा कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू आहे.

दररोज सुमारे २५०–३०० ग्राहक इथे भेट देतात, विशेषतः शाळेच्या वेळात व आठवड्याच्या दिवसांत. एकाच ठिकाणी दीर्घकाळ सुरू असलेल्या या व्यवसायाची ओळख आहे — सातत्य, परंपरा आणि स्थानिकांचा अपार विश्वास.

पूर्णानंद भंडार सिद्ध करतं की खरी चव आणि मनापासून दिलेली सेवा काळाच्या कसोटीवर नेहमी खरी उतरते.


चव आणि परंपरेचा आरंभ

छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपूरा परिसरातील SB कॉलनी ईस्टमध्ये वसलेलं पूर्णानंद भांडार केवळ नाश्त्याचं दुकान नाही - ते शाळकरी मुलांचं, जुन्या विद्यार्थ्यांचं आणि स्थानिकांचं एक आठवणींचं ठिकाण आहे. त्यांच्या सुप्रसिद्ध वडा-पाव आणि समोशासाठी हे ठिकाण विशेष ओळखलं जातं.

१९७१ मध्ये कै. श्री. हरी  कर्वे  यांनी सुरू केलेला हा कौटुंबिक व्यवसाय आज तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वाखाली आहे - श्री. विजय हरी कर्वे आणि त्यांचे पुत्र पद्मनाभ कर्वे  हे आजही त्या चविचं आणि सेवाभावाचं सार जपून ठेवत आहेत.


विकासाची दिशा

पूर्णानंद भांडार चे वैशिष्ट्य म्हणजे , सुरुवातीचा उद्देश खरा तर खाद्यपदार्थ नव्हताच. श्री. हरी कर्वे यांनी बँकेतील व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्यावर, आणि त्याआधी शिक्षक म्हणून काम केल्यानंतर, एका शाळेसमोर स्टेशनरी दुकान सुरू केलं. गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही-पेन देणं हे त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचं एक भाग होतं.

विद्यार्थी केवळ साहित्य घेण्यासाठी नाही, तर त्या दुकानातील आपुलकीच्या वातावरणासाठी परत परत यायचे. हळूहळू त्यांच्या भुकेची जाणीव होत गेली आणि काही स्नॅक्स मेन्यूमध्ये जोडले गेले. गोड पदार्थांपासून सुरुवात करून पुढे संपूर्ण खाद्यपदार्थांचं रूप घेणारं पूर्णानंद भांडार हळूहळू घडत गेलं.

 

कसोटीचे क्षण

सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते - सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत काम. श्री. हरी कर्वे यांच्या निवृत्ती निधीवर आणि त्यांच्या पत्नी (शारदा मंदिर हायस्कूलमधील शिक्षिका) यांच्या साथीवर उभारलेला हा व्यवसाय हळूहळू विश्वासार्हतेचा एक प्रतीक ठरला.

त्यांचा सुप्रसिद्ध वडा-पाव आणि समोसा यांची रेसिपी 1984 मध्ये पूर्णत्वास आली - आणि ती आजही कौटुंबिक गुप्तता म्हणून जपली जाते. चणाडाळ अजूनही घरीच दळली जाते. साहित्य स्थानिक बाजारातून घेतलं जातं आणि दर ८–१५ दिवसांनी थोड्याथोड्याने खरेदी केली जाते - जेणेकरून ताजेपणा टिकावा आणि वाया जाणं टळावं.

 

व्यावसायिक तत्त्वज्ञान

कोविड-१९ काळ हा त्यांच्या व्यवसायासाठी सर्वात कठीण काळांपैकी एक होता. पण दुकान बंद करणं कधीच पर्याय नव्हता. त्यांनी आपल्या सौर ऊर्जा व्यवसायाकडून आधार घेतला, संयम राखला आणि दर्जाअधिक बळकट केला.

एका टप्प्यावर ते झोमॅटोवरही होते, पण किंमती वाढणे आणि व्यक्तिशः संवादाचा अभाव यामुळे त्यांनी ऑनलाइन डिलिव्हरी बंद केली. त्यांची निष्ठा आजही थेट ग्राहकसेवेशी आहे - विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, जे नेहमीच त्यांच्या व्यवसायाचे खरे आधारस्तंभ राहिले आहेत.

पूर्णानंद भांडारचे मूल्य अतिशय सोपे, पण ठाम आहेत:

·      नेहमी ताजं देणं.

·      दर्जावर कधीही तडजोड नाही.

·      प्रत्येक पदार्थ आधी स्वतः चाखूनच ग्राहकांना देणं.

·      विद्यार्थ्यांसाठी जागा राखण्यासाठी गर्दी टाळणं - म्हणून चहाही विकला जात नाही.

याचबरोबर, ते डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या मुंबईतील संस्थेसारख्या उपक्रमांमध्येही आर्थिक मदत करत असतात - कारण त्यांचा विश्वास आहे की व्यवसाय नाती तयार करतो, केवळ नफा नाही.

 

आगामी वाटचाल

आता सुरू होतोय एक नवा अध्याय. पद्मनाभ कर्वे  पुण्यात विस्तार करण्याच्या योजना आखत आहेत - जिथे त्यांचे जुने विद्यार्थी आजही पूर्णानंद भांडारच्या खास चवीसाठी आतुर आहेत. हे फ्रँचायझी रूपात उभं करणं हे स्वप्न आहे - पण एक अट आहे: मूळ चव आणि मूल्यांची अचूक जपणूक. प्रत्येक नवीन शाखा "घरासारखी"च वाटली पाहिजे.

युवक उद्योजकांसाठी सल्ला - श्री. विजय हरी करवे यांच्याकडून:

“स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्पर्धेकडे नाही, उद्दिष्टाकडे बघा.यश मिळायला वेळ लागतो — पण दर्जा कायम ठेवला, की यश मिळतेच.

 
 
 

Comments


Collaborate with Us

NSBT, Gate no. 5, 

MGM Campus, N6 CIDCO,

Chh. Sambhajinagar

7720010026

Sakriya Sambhajinagar

 

© 2025 by Sakriya Sambhajinagar. Crafted with passion.

 

bottom of page