top of page
Search

पाटील मामा वडा पाव 

  • NSBT
  • Aug 21
  • 2 min read

Updated: Aug 24


ree

₹१०० पासून सुरू झालेला प्रांतीय वारसा


छत्रपती संभाजीनगरच्या चैतन्य नगरातील गजबजलेल्या गल्लीत १९९० साली सुरू झालेला “पाटील मामा वडा पाव” हा उपक्रम आज शहराची ओळख बनला आहे. साध्या वडा-पावपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय लवकरच लोकांच्या जिभेवर रुजला. दर्जावरची निष्ठा, पाककृतीचं मानकीकरण आणि प्रत्येक ग्राहकाला समान अनुभव देण्याची बांधिलकी या गोष्टींनी पाटील मामांना एक विश्वासार्ह ब्रँड बनवलं. कोविड-१९ सारख्या संकटातही चव, स्वच्छता आणि सातत्य जपून त्यांनी व्यवसाय टिकवून ठेवला. आज दुसरी व तिसरी पिढी हातभार लावत असून, हा वारसा प्रामाणिकपणाचा, मेहनतीचा आणि मूल्यांचा जिवंत आदर्श ठरला आहे.


चव आणि परंपरेचा आरंभ

छत्रपती संभाजीनगरमधील चैतन्य नगरच्या गजबजलेल्या गल्लीमध्ये, पाटील मामा वडा पाव या नावाने 1990 साली एक छोटासा हातगाडी व्यवसाय सुरू झाला — फक्त ₹100 हातात होते आणि एक स्वप्न. श्री. पाटील यांनी "काहीतरी स्वतःचं सुरू करायचं" या इच्छेने हा प्रवास सुरू केला.

हाताशी होती मेहनतीची तयारी आणि साधा वडा-पावचा पदार्थ.  थोड्याच वेळात त्या चवीनं लोकांच्या मनात स्थान मिळवलं.  जी सुरुवात एक लहानसं धाडस म्हणून झाली, ती हळूहळू एका आवडत्या आउटलेटमध्ये  आणि शेवटी एका ब्रँडमध्ये - रूपांतरित झाली.

 

विकासाची दिशा

सुरुवातीची वर्षं सोपी नव्हती.  स्थायिक जागा नव्हती, साधनं कमी होती, आणि प्रत्येक दिवस हा संयमाची परीक्षा होती.  पण  कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःच्या चविवर असलेला विश्वास - या दोन गोष्टींनी त्यांना टिकवलं.

त्यांचा खरा टर्निंग पॉईंट होता : सातत्य -  चव बदलली नाही, गुणवत्ता कमी झाली नाही.पाककृती ला मानकीकरण दिलं, म्हणजे प्रत्येक ग्राहकाला रोज तसाच अनुभव मिळतो. ही खात्रीच लोकांचं विश्वासात रूपांतर झाली - आणि त्या विश्वासानं मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला.

 

कसोटीचे क्षण

कोविड-१९ लॉकडाऊन हा त्यांच्या व्यवसायाला सर्वात मोठा धक्का होता.  अचानक विक्री थांबली, भविष्य अनिश्चित झालं.  पण कुटुंबाच्या चिकाटीमुळे व्यवसाय वाचला आणि पुढे चालू राहिला.

आजही, वाढती स्पर्धा आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सच्या युगात, पाटील मामा वडा पाव टिकून आहे - कारण त्यांची मुळाशी असलेली निष्ठा आहे चव, स्वच्छता आणि समुदायाशी बांधिलकी.

 

व्यावसायिक तत्त्वज्ञान

पाटील मामा यांचा व्यवसाय कधीही गाज्यावाज्याने किंवा जाहिरातींवर चाललेला नाही. तोंडी प्रचार आणि निष्ठावान ग्राहक हाच त्यांचा खरी ओळख आहे.

एक छोटी पण अर्थपूर्ण गोष्ट - दुकानासमोर २४/७ मोफत प्यायचं पाणी उपलब्ध आहे. दिसायला साधं वाटतं, पण हीच विचारशीलता त्यांना ग्राहकांच्या मनात घर करून देते.

 

व्यावसायिक तत्त्वज्ञान

आज व्यवसायाचं नेतृत्व दुसऱ्या पिढीतले श्री. अरविंद पाटील करत आहेत. ते स्वतः रोज दुकानावर लक्ष ठेवतात - कारण ते मूळ चव जशीच्या तशी जपायची हीच भूमिका घेतात.

त्यांचा व्यवसायाचा मूलमंत्र:

·      दर्जेदार अन्न द्या

·      प्रत्येक ग्राहकाला आदर द्या

·      आपल्या कामाशी निष्ठावान राहा

ही प्रामाणिकता म्हणजेच खरी ओळख — आणि तीच ग्राहक परत परत खेचून आणते.

 

आगामी वाटचाल

भविष्याकडे पाहताना, श्री. अरविंद पाटील यांचं ध्येय आहे — मूळपण जपून अधिक लोकांपर्यंत पोहोचणं. तिसरी पिढी देखील आता व्यवसायात सहभागी होत आहे, त्यामुळे हा वारसा योग्य हातात आहे.

उदयोन्मुख उद्योजकांसाठी सल्ला:

“मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि यश तुमच्या मागे येईल.” — अरविंद पाटील

 
 
 

Comments


Collaborate with Us

NSBT, Gate no. 5, 

MGM Campus, N6 CIDCO,

Chh. Sambhajinagar

7720010026

Sakriya Sambhajinagar

 

© 2025 by Sakriya Sambhajinagar. Crafted with passion.

 

bottom of page